... हे दृष्टचक्र थांबल्याशिवाय उस्मानाबादचा विकास अशक्य - सुनील ढेपे

पुणे - सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हे दृष्टचक्र थांबविण्यासाठी मतदारांनी आता जागृत होण्याची गरज आहे,जो पर्यंत मतदार जागृत होणार नाहीत,तोपर्यंत उस्मानाबादचा ख-या अर्थाने विकास होणार नाही,असे परखड मत 'उस्मानाबाद लाइव्ह'चे संपादक सुनील ढेपे यांनी येथे मांडले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पुणे आणि मुंबईत राहणा-या उस्मानाबादकरांचा 'उस्मानाबाद मिलाप - २०१३' हा स्नेहमेळावा पार पडला.या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुनील ढेपे बोलत होते.
उस्मानाबाद आणि लातूर जिल्हा पुर्वी एकत्र होता,मात्र १९८२ रोजी वेगळया झालेल्या लातूर जिल्ह्याचे उत्तुंग भरारी घेतली.विलासराव देशमुख यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व लातूर जिल्ह्याला लाभल्यामुळे लातूरची प्रगती झाली.उस्मानाबादच्या नेत्यांना विकासाऐवजी निवडणुक आली की,मतदारांना प्रलोभणे दाखवायची आणि निवडून यायचे ऐवढेच माहित आहे.त्यामुळे सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हे दृष्टचक्र सुरू आहे.
उस्मानाबादचे अनेक प्रश्न राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीअभावी धूळखात पडले आहेत.तेरणा कारखाना,जिल्हा मध्यवर्ती बॅक,दुध संघावर आजपर्यंत कोणाची सत्ता होती,त्या पापाचे धनी कोण ? असा प्रश्नही ढेपे यांनी उपस्थित करून मतदारांनी आता जागृत होण्याची गरज प्रतिपादन केली.
आता पत्रकारांची मक्तेदारी राहिलेली नाही.प्रत्येकजण आता पत्रकार झालेला आहे. फेसबुक,ट्युटर,ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येकजण मतदारांची जनजागृती करू शकतो,असे सांगून येणा-या प्रत्येक निवडणुकीत सिटीजन्स जर्नालिझम मोठी करामत करेल,असेही श्री.ढेपे म्हणाले.
उस्मानाबाद लाइव्ह हे कोणत्याही एका राजकीय पक्षाचे मुखपत्र नाही.कोणत्याही एका नेत्यांचे तळी उचलणारे माध्यम नाही,जे सत्य असेल,तेच देवू,भले सत्य कितीही कडवट असेल तरी त्याची परवा करणार नाही,अशी ग्वाही श्री.ढेपे यांनी दिली.
उस्मानाबाद सोडून गेलेल्या लोकांना मी उस्मानाबादचा आहे,हे सांगायला लाज वाटते,मात्र दयानंद पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी पुण्यात उस्मानाबाद मिलाप कार्यक्रम घेवून,एक आगळा - वेगळा इतिहास घडविला असून,या कार्यक्रमाचा समस्त उस्मानाबादकरांना अभिमान असल्याचेही गौरवोद्गार श्री.ढेपे यांनी यावेळी काढले.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक दयानंद पाटील,प्रदीप लोखंडे,गोरख भोरे,विक्रम साळवे यांचीही भाषणे झाली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप कदम,दत्तात्रय करंवदे व त्यांच्या सर्व सहका-यांनी परिश्रम घेतले.

उस्मानाबादेत डिसेंबर महिन्यात टेक्नो प्रदर्शन होणार आहे.या प्रदर्शनाच्या पत्रिकेचे प्रकाशन उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे,गोरख भोरे,दयानंद पाटील,प्रदीप लोखंडे,प्रदीप पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. - See more at: http://www.osmanabadlive.com/Mainnews-222-...%20%E0%A4%B9%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%20%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%20%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%20%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%87-.html#sthash.YGzTAqlq.dpuf

पुणे - सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हे दृष्टचक्र थांबविण्यासाठी मतदारांनी आता जागृत होण्याची गरज आहे,जो पर्यंत मतदार जागृत होणार नाहीत,तोपर्यंत उस्मानाबादचा ख-या अर्थाने विकास होणार नाही,असे परखड मत 'उस्मानाबाद लाइव्ह'चे संपादक सुनील ढेपे यांनी येथे मांडले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी  पुणे आणि मुंबईत राहणा-या उस्मानाबादकरांचा  'उस्मानाबाद मिलाप - २०१३' हा स्नेहमेळावा पार पडला.या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुनील ढेपे बोलत होते.

उस्मानाबाद आणि लातूर जिल्हा पुर्वी एकत्र होता,मात्र १९८२ रोजी वेगळया झालेल्या लातूर जिल्ह्याचे उत्तुंग भरारी घेतली.विलासराव देशमुख यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व लातूर जिल्ह्याला लाभल्यामुळे लातूरची प्रगती झाली.उस्मानाबादच्या नेत्यांना विकासाऐवजी निवडणुक आली की,मतदारांना प्रलोभणे दाखवायची आणि निवडून यायचे ऐवढेच माहित आहे.त्यामुळे सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हे दृष्टचक्र सुरू आहे.
उस्मानाबादचे अनेक प्रश्न राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीअभावी धूळखात पडले आहेत.तेरणा कारखाना,जिल्हा मध्यवर्ती बॅक,दुध संघावर आजपर्यंत कोणाची सत्ता होती,त्या पापाचे धनी कोण ? असा प्रश्नही ढेपे यांनी उपस्थित करून मतदारांनी आता जागृत होण्याची गरज प्रतिपादन केली.
आता पत्रकारांची मक्तेदारी राहिलेली नाही.प्रत्येकजण आता पत्रकार झालेला आहे. फेसबुक,ट्युटर,ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येकजण मतदारांची जनजागृती करू शकतो,असे सांगून येणा-या प्रत्येक निवडणुकीत सिटीजन्स जर्नालिझम मोठी करामत करेल,असेही श्री.ढेपे म्हणाले.
उस्मानाबाद लाइव्ह हे कोणत्याही एका राजकीय पक्षाचे मुखपत्र नाही.कोणत्याही एका नेत्यांचे तळी उचलणारे माध्यम नाही,जे सत्य असेल,तेच देवू,भले सत्य कितीही कडवट असेल तरी त्याची परवा करणार नाही,अशी ग्वाही श्री.ढेपे यांनी दिली.

उस्मानाबाद सोडून गेलेल्या लोकांना मी उस्मानाबादचा आहे,हे सांगायला लाज वाटते,मात्र दयानंद पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी पुण्यात उस्मानाबाद मिलाप कार्यक्रम घेवून,एक आगळा - वेगळा इतिहास घडविला असून,या कार्यक्रमाचा समस्त उस्मानाबादकरांना अभिमान असल्याचेही गौरवोद्गार श्री.ढेपे यांनी यावेळी काढले.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक दयानंद पाटील,प्रदीप लोखंडे,गोरख भोरे,विक्रम साळवे यांचीही भाषणे झाली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप कदम,दत्तात्रय करंवदे व त्यांच्या सर्व सहका-यांनी परिश्रम घेतले.

उस्मानाबादेत डिसेंबर महिन्यात टेक्नो प्रदर्शन होणार आहे.या प्रदर्शनाच्या पत्रिकेचे प्रकाशन उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे,गोरख भोरे,दयानंद पाटील,प्रदीप लोखंडे,प्रदीप पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.