उस्मानाबाद लाइव्ह : मिशन २०२० !


उस्मानाबाद लाइव्हच्या प्रतिसाद सदरात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश -विदेशातील मराठी वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. त्यातील एक प्रतिक्रिया आम्हाला महत्वाची वाटते...
विदर्भातील वर्धा येथील एका इंजिनिअरींग कॉलेजमधील आयटीचे प्रोप्रेसर प्रकाश सर यांनी एका महिन्यापुर्वी आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.ते म्हणतात...
its new concept for new generation of mission 2020.i specially thanks to mr.dhepe. he give new concept to new generation .be proud we r indian...
* prakash mujbaile , wardha
त्यावेळी प्रकाश सरांची प्रतिक्रिया वाचून आम्ही भारावून गेलो होतो.त्यात भर पडली आहे, ज्येष्ठ पत्रकार माधव शिरवळकर यांनी केलेल्या भाकीतामुळे...६ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात पत्रकार दिन मोठ्या उत्साहाने पार पडला. औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्रपत्र विभागात झालेल्या कार्यशाळेत शिरवळकर म्हणतात की, पुढील दशकात म्हणजे सन २०२० च्या आसपास ई - पेपर्स वृत्तपत्रांची जागा घेतील.
त्या बातमीची लिंक आम्ही येथे देत आहोत.
http://www.osmanabadlive.com/rashtra_maharashtra.php?cat=Rashtra_maharashtra&key=1268
जे विधान एक महिन्यापुर्वी प्रोप्रेसर प्रकाश यांनी केले होते, तेच विधान ज्येष्ठ पत्रकार माधव शिरवळकर यांनी केल्यामुळे आम्हाला नवी प्रेरणा मिळाली आहे.
महाराष्ट्रात मराठवाडा व मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा मागास आहे. उस्मानाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण असले तरी लोकसंख्या फक्त एक लाखाच्या आसपास आहे. येथे औद्योगिकरण नसल्यामुळे विकास नाही.घराचे बंगले झाले, गल्लीच्या कॉलन्या झाल्या पण उस्मानाबाद शहर वाढलेल्या वृक्षासारखा ...तुळजाभवानी व हवा - पाणी सोडले तरी या जिल्ह्याची नवी ओळख नाही.आता हवा आणि पाणीही प्रदूषित झाले आहे. सहा महीन्यापुर्वी येथून एक रंगीत वृत्तपत्र सुरू झाले आहे. महिलांचे वय व वृत्तपत्रांचा खप विचारू नये, म्हणून आम्ही या वृत्तपत्राचा खप सांगत नाही.सांगण्याचा मुद्दा म्हणजे मागास उस्मानाबाद जिल्हयात ई - पेपर सुरू करणे म्हणजे मोठे धाडसच होय. हे धाडस आम्ही केले.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व कुलदैवत श्री खंडोबाचा आशिर्वाद व जनता - जनार्दनाच्या पाठिंब्यावर ८ ऑक्टोबर २०१० रोजी उस्मानाबाद लाइव्ह सुरू झाले. त्यादिवशी नवरात्र सुरू झाला होता, व घटस्थापना होती. घटस्थापनेच्या दिवशीच उस्मानाबाद लाइव्हची स्थापना झाली व केवळ तीन महिन्यात जगभरातील असंख्य वाचक उस्मानाबाद लाइव्हने मिळविले आहेत.
मला पुर्वीपासूनच नवनविन प्रयोग करण्याचा छंद आहे. देशात व जगात आलेले नविन तंत्रज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा आहे.सन १९९९ मध्ये एकमत सोडल्यानंतर मुक्तरंग कम्युनिकेशन सुरू केले. त्यावेळी उस्मानाबादमध्ये पहिले इंटरनेट कॅफे सुरू केले होते. त्यावेळच्या काही गंमती - जंमती आजही आठवतात.
दुकानाच्या बाहेर आम्ही एक बोर्ड लावला होता, मुक्तरंग इंटरनेट कॅफे....हा बोर्ड वाचून काही जण दुकानात येवून कॉफी मागत होते. त्यावेळी एका सिव्हील सर्जनने कॅफे सुरू केले म्हटल्यावर...छान..आम्ही पण कॉफी पिण्यास येवू म्हटले होते. आता कुठे लोकांना इंटरनेट म्हणजे काय असे समजू लागले आहे. गेल्या दहा वर्षापासून आम्ही इंटरनेटचा वापर करीत असल्यामुळे आम्हाला ई - पेपर सुरू करण्याची कल्पला सुचली.मराठवाड्यात दोन -तीन ई - पेपर्स आहेत पण क्षणाक्षणाला अपडेट करणारे एकमेव आमचे ई - पेपर आहे.
उस्मानाबादमधील काहीजण आम्हाला सहज विचारतात...सध्या कोणत्या पेपरचे काम करता... त्यांना उस्मानाबाद लाइव्ह सुरू केले म्हटल्यावर आहो, ते बुक -स्टॉलवर दिसत नाही म्हणतात...त्यांना मी मकरंद अनासपुरेचा एक विनोदी डॉयलॉग म्हणून दाखवितो...असले छापील धंदे आम्ही करीत नाही... मग लोक हसतात व नंतर त्यांना उस्मानाबाद लाइव्ह म्हणजे नेमके काय आहे, ई - पेपर्स म्हणजे काय, हे समजावून सांगतो.
दहा वर्षापुर्वी ज्यावेळी इंटरनेट कॅफे सुरू केले होते, त्यावेळी ज्या गंमती - जमती होत होत्या त्याच आता ई - पेपरर्स केल्यानंतर होत आहेत.पण हे आमचे मिशन २०२० आहे...हे त्यांना कुठे माहित...?